Waw Factor
Be unique and Be you.. Let your style describe your personality..
17/06/2026
At the end of the day, it's human effort that truly matters.
Loksatta new
Date 16th June 2026
अन्वयार्थ: ‘हाडामांसाच्या रोबों’ना (अखेरचा) निरोप!
‘संगणक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनशास्त्र- एमबीए- अभ्यासक्रमांचे युग आता संपले’ हे निरीक्षण देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी एका मुलाखतीत नोंदवले.
या विधानाला पुष्टी देणारे काही मुद्देही त्यांनी पुढे मांडले. भारताने जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर ज्या दोन पदव्यांची आताआतापर्यंत चलती होती, त्यांचे युग संपले, असे खुद्द देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणत असल्याने त्याची दखल घेणे क्रमप्राप्त. ते असे का म्हणताहेत? या दोन अभ्यासक्रमांचे अस्तित्वच पूर्ण संपून जाणार आहे का?
संगणकशाय्त्र, सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, एमबीए हे अभ्यासक्रम केले की आयुष्य स्थिरावले, असा समज विशेषतः मध्यमवर्गीयांनी बाळगला होता, आहे. नागेश्वरन यांचे वक्तव्य या समजाला मोठा तडा देणारे आहे आणि तो तडा जाणेसुद्धा आवश्यकच आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कृत्रिम प्रज्ञा (एआय). मुळात संगणकशास्त्राशी संबंधित एखादा अभ्यासक्रम करून ज्या कामासाठी सॉफ्टवेअर अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश मिळायचा, ते कामच ‘एआय’ करू लागला आहे. त्यामुळे त्यासाठी मनुष्यबळ नेमण्याची गरजच कंपन्यांना नाही. ‘एमबीए’बाबतही तेच. एखाद्या कामाचे प्राथमिक विश्लेषण, विपणन यासाठी एखादे ‘एआय’ साधन पुरेसे असल्याने एमबीए पदवीधरांची फौज नेमण्यात हशीलच उरलेले नाही. या अर्थाने नागेश्वरन म्हणतात त्याप्रमाणे या दोन पदव्यांचे युग संपले आहे. नागेश्वरन जे म्हणत आहेत, त्याची चाहूल काही काळात लागली होती.
एआय एजंट आणि भविष्यातील बदल
अलीकडेच ‘टीसीएस’ या सॉफ्टवेअर क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या देणाऱ्या कंपनीने म्हटले की, येत्या तीन वर्षांत कंपनीत जितके मनुष्यबळ काम करेल, तेवढ्याच संख्येने त्यांच्याबरोबर ‘एआय एजंट’ काम करतील. याचा अर्थ सध्याच्या मनुष्यबळालाही एआय एजंटबरोबर काम करायला शिकावे लागेल. अन्यही बड्या सॉफ्टवेअर कंपन्या याच मार्गाने जायचे म्हणत आहेत. खुद्द ‘अँथ्रोपिक’चा राडार चार्ट – जो कोणकोणत्या क्षेत्रात ‘एआय’चा शिरकाव होऊन त्या नोकऱ्याच संपून जातील, असे दर्शवतो – त्यातही नागेश्वरन यांनी सांगितलेल्या दोन क्षेत्रांनाच सर्वाधिक धोका असल्याचे दिसते.
आता दुसरा प्रश्न या दोन पदव्यांच्या अस्तित्वाचा. तर, त्याचे उत्तर ‘बदल’ हेच आहे. या अभ्यासक्रमांत, त्यांच्या उपयोजनांत आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या रोजगारक्षमतांत वाढ करणारे बदल होत नाहीत, तोवर ते कालसुसंगत नसतील. उदा.- संगणकशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना सध्या भरती करताना नुसता सॉफ्टवेअर डेव्हलपर चालत नाही, तर एआय असिस्टेड सॉफ्टवेअर डेव्हलपर लागतो. थोडक्यात, ‘एआय’ फक्त वापरता येणारे नाही, तर त्याच्याबरोबर काम करता येणारे मनुष्यबळ निर्माण करावे लागेल. पुन्हा पुढे जाऊन सगळेच काम ‘एआय’ करू लागल्याने ही नोकरीसुद्धा संपून जाऊ शकण्याचा धोका आहेच. म्हणूनच नागेश्वरन या मुलाखतीत पुढे जे म्हणतात की, बेरोजगारी आणि रोजगार अक्षमता या दोन्ही प्रश्नांना एकत्र भिडायची गरज आहे, तेही महत्त्वाचे.
मानवी कौशल्यांचे महत्त्व आणि सामाजिक दृष्टिकोन
भांडवलप्रधान उद्योग नोकऱ्यांची गरज पूर्ण करू शकणार नाहीत. वर म्हटल्याप्रमाणे या उद्योगांत ‘एआय’ जवळपास सर्व कामे करेल. अशा वेळी भारतात रोजगार निर्माण करू शकणारे उद्योगच वाढवण्याची गरज आहे. म्हणून नागेश्वरन यांनी इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, पाककला, रुग्णालये वा वृद्धांसाठीचे काळजीवाहक, क्रीडा शिक्षण अशा क्षेत्रांचा उल्लेख केला. या क्षेत्रांत एआय नव्हे, तर जिवंत माणसेच उपयोगी पडणार आहेत आणि याची केवळ भारताला नव्हे, तर साऱ्या जगाला गरज आहे.
नागेश्वरन यांची खंत अशी, की मानवी कौशल्ये आणि शारीरिक कष्टावर आधारित कामांचा आपण उचित आदर करत नाही. ती बरोबरच. तो आदर न रुजण्याला जातिव्यवस्थेपासून वर्गव्यवस्थेपर्यंतची सामाजिक कारणे आहेत. त्यासाठी मूठभरांनी आर्थिक सुबत्तेच्या जोरावर बहुसंख्यांना सामाजिक उणेलेपण कसे आणले, याच्या विश्लेषणात जावे लागेल. आता ‘एआय’ ही व्यवस्था नष्ट करेल की आणखी दृढ करेल, हे येणारा काळ ठरवेल. पण नागेश्वरन यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने इतके तरी स्पष्ट आहे की, सध्या ‘एमबीए’ किंवा ‘सॉफ्टवेअर इंजिनीअर’ होऊन नोकऱ्या मिळवणे- या नोकऱ्यांआधारे जीवनशैली बदलणे आणि मग त्या जीवनशैलीच्याच अधीन होऊन जगणे अशा यंत्रवत चक्रात अडकलेल्या ‘हाडामांसाच्या रोबों’ना अखेरचा निरोप मिळणार.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Sangram Nagar
Akluj
413101