DigiBharati Education Foundation

DigiBharati Education Foundation

Share

Digibharati Education Foundation is Pune based Not-for-Profit Entity dedicated to Education, Innovation in Academia

01/03/2024

३ मिनिटात ३.५% ब्राह्मण संपऊन टाकू
अशी समाज माध्यमातून दिलेली धमकी हे गेली काही वर्षे महाराष्ट्रात पेरलेले जातीयतेचे विषाचा परिणाम आहे . यास राष्ट्रवादी ( शरद पवार) यांचा पक्ष जबाबदार आहे हे वस्तुस्थिती लक्षात घेता कडे नाकारत येईल ?

21/02/2024

आरक्षण प्रश्न संबंधी काही प्रश्न

मराठा आरक्षण महाराष्ट्र सरकारने दिले , स्वागत .
परंतु कुणबी मराठ्यांना अन्य मागासवर्ग गटातून व अन्य मराठ्यांना या नवीन आरक्षण मिळणार , पर्यायाने एकूण मराठा लोकसंख्या प्रमाणात मराठ्यांना आरक्षण दिले जाणार का ? लोक समंख्या प्रमाणात दिले जाणारे आरक्षण हे घटनेस मंजूर होणार का ?
तसेच आर्थिक दृष्ट्या मागास वर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळणे बंद होणार का ?
उर्वरित ३८ % जागा खुल्या वर्ग साठी राहणार त्यातून आरक्षित गटाला खुल्या प्रवर्गातून ,शैक्षणिक प्रवेश नोकरी मिळणार का ?
पर्यायाने खुल्या वर्गासाठी ३८% आरक्षण मिळाल्यात जमा आहे का ?
तसेच आर्थिक दृष्ट्या मागास आरक्षण १०% व खुल्या वर्ग साठी उपलब्ध जागा ३८% म्हणजे एकूण ४८% जागा खुल्या प्रवर्ग साठी उपलब्ध झाल्या का ?
कोणतेही आंदोलन संघर्ष न करता ४८ % आरक्षण खुल्या प्रवर्ग मिळत असेल तर या आरक्षण व्यवस्थेने मागास वर्गाला न्याय दिला असे म्हणता येईल का ?

27/07/2023

विद्यापीठ परीक्षांचे निकाल उशीरा का लागतात ? यावर उपाय काय ?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षांचे निकाल उशीरा लागतात , या संदर्भात आज वर्तमानपत्रात एक बातमी वाचनात आली . १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात कार्यक्रम निमित्ताने येणार आहेत त्या पूर्वी विद्यापीठ परीक्षांचे निकाल जाहीर होणार . असे विधान उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याचे प्रसिद्ध झाले आहे . खरेतर प्रश्न पडतो नरेंद्रा मोदी पुण्यात येण्याचा व विद्यापीठ परीक्षांचे निकाल जाहीर होण्याचा काय संबंध ? नरेंद्र मोदी पुण्यात येतील अथवा नाहीत विद्यापीठ परीक्षांचे निकाल लागलेच पाहिजेत ना ? यात पंतप्रधान यांचा पुण्यातील वास्तव्याचा दबाव लक्षात घेऊन विद्यापीठ परीक्षा विभाग काम करणार आहे का ? तसा या फोन घटनाचा बादरायण संबंध नाही हे स्पष्टपणे लक्षात घेतले पाहिजे .
विधान सभेच्या अध्यक्ष श्री नार्वेकर यांनी विद्यापीठ परीक्षांचे निकाल उशीरा लागणे ही गंभीर बाब आहे असे मत प्रदर्शन केले आहे . विद्यार्थी परिषदेने काही दिवस पूर्वी विद्यापीठात आंदोलन केले , परीक्षांचे निकाल वेळेत लागत नाहीत या प्रश्नावर . या बाबत आंदोलन पद्धती वरून परिषदे वर टीका करण्यात आली .
आज परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांचे निवेदन प्रसिद्ध झाले आहे त्यांच्या निवेदन नुसार मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या पदवी परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत . बाकी परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होतील या साठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील आहे .
विद्यापीठ कुलगुरूंनी नुकताच कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला आहे . ते परिस्थिती नियंत्रण खाली ठेवत आहेत . पण ही परिस्थिती का निर्माण होते ? ७५ वर्षे पूर्ण करत असलेल्या विद्यापीठात परीक्षा व्यवस्था परिस्थिती सापेक्ष पद्धतीने प्रस्थापित का कार्य करता येत नाही . विद्यापीठ कायद्यात तरतूद आहे परीक्षा संपल्या नंतर ४५ दिवसात परीक्षांचे निकाल जाहीर करणे बंधन कारक आहे . तसे न झाल्यास कुलगुरूंनी कुलपतींना आवश्यक स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे . प्रश्न स्पष्टीकरण देण्याचा नाही . मुळात हा प्रश्नच का निर्माण होतो हा आहे .
परीक्षेचा निकाल लावण्याच्या कामात दोन भाग आहेत १ उत्तर पत्रिकांचे प्राध्यापकांनी करावयाचे मुल्यांकन २ परीक्षा निकाल व्यवस्थापन . या दोन्ही भागात काही प्रश्न आहेत परिणामी परीक्षांचे निकाल उशीरा लागतात , विद्यापीठ कायदा तरतुदींचा भंग होतो , विद्यार्थ्यांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते . ज्यांचा मुळे परीक्षा निकाल लागण्यास उशीर होतो त्यांना कोणत्याच कारवाईला समोर जावे लागत नाही . झालीच तर दंडात्मक , परीक्षेच्या कामातून निलंबन . अशी कारवाई होते . यातील दुसरी कारवाईचे प्राध्यापक नेहमीच स्वागत करतात . कारण त्यांची परीक्षेच्या कामातून सुटका होते . पहिल्या कारवाईचे विशेष वाटत नाही कारण प्राध्यापकांचे वाढलेले पगार . परिणामी दंड भरणे प्राध्यापकांना विशेष टोचणी देणारे ठरत नाही .
परीक्षा निकालात असलेली प्रशासकीय दिरंगाई हा गंभीर विषय आहे . या बाबत परीक्षा नियंत्रक जबाबदार धरले पाहिजे . तसेच परीक्षेच्या कामात प्राध्यापकांचा सहभाग हा त्यांच्या सेवा कर्तव्यचा अनिवार्य भाग करणे गरजेचे आहे . परीक्षेच्या कामासाठी प्राध्यापक उपलब्ध होत नाहीत यास संबधित प्राध्यापक व त्यांच्या प्राचार्य यास जबाबदार धरले पाहिजे . हे करणे अत्यंत गरजेचे आहे .
ऐका दिवशी केंद्रीय मुल्यांकन केंद्रावर ६ तासात ६० पेक्षा जास्त उत्तर पत्रिका तपासू नये , पात्र व संबधित विषयाच्या प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका वेळेत मुल्यांकन करणे , अंतर्गत मूल्यमापनाचे गुण दिलेल्या मुदतीत विद्यापीठ यंत्रणेत पाठवणे . प्राध्यापक व परीक्षा विभाग याच्यातील संवादाचा अभाव यातून परीक्षा निकाल उशीर होतो हे स्पष्ट आहे .
पूर्वी विद्यापीठात ऐका दिवशी ४०० पेक्षा अधिक उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकन केले हा प्रश्न गाजला होता . अतिरिक्त उत्तरपत्रिंकाचे मुल्यांकन केलेल्या प्राध्यापका वर कारवाई केली पण पुढील मुल्यांकन करण्यास प्राध्यापक उपलब्ध न झाल्याने कारवाई झालेले प्राध्यापक मूल्यांकन करण्यासाठी पुन्हा निमंत्रीत करावे लागले हे विद्यापीठातील वास्तव अजून बदललेले नाही .
य सर्व प्रश्र्नी विद्यार्थी मात्र समस्या तोंड देतो हे वास्तव केव्हा बदलणार ?
विद्यापीठ परीक्षा ससंगणक प्रणाली द्वारा संचालित करावी , हे केव्हा साध्य होणार या बाबत केव्हा योजना होणार ? विद्यापीठ ७५ वर्षे पूर्ण होत असताना हे साध्य होईल का ? या वरच विद्यापीठाची गुणवत्ता अवलंबून आहे हे सत्य आपण स्वीकारले पाहिजे .
धनंजय कुलकर्णी
माजी अधिसभा सदस्य
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ .
पुणे .

23/07/2023

NDA will rule INDIA for next 100 year . It is the commitment of INDIA's voters . Because INDIAN voters are against Antinationals

18/12/2021

मराठी साहित्यातील अभिजात ग्रंथ ,
महाकवी ग. दि. माडगूळकर रचित गीत रामायण

जेष्ठ संगीतकार गायक सुधीर फडके यांनी त्यास स्वरबध्द केले व गायलेले , मराठी जनतेचे श्रध्दा स्थान
गीत रामायण

आजच्या मराठी युवकांशी गीतरामायण या महाकाव्या विषयी सहज संवाद साधणारा , तरुणांच्या मनाचा ठाव घेणारा धनंजय कुलकर्णी लिखित ग्रंथ ' पत्ररुप भावार्थ गीतरामायण '.

गीत रामायणाचा भावार्थ , साहित्यार्थ , संगीतार्थ पत्ररुपात युवकांना कथन करणारा ' आनंद संवाद '
ग्रंथ म्हणजे ' पत्ररुप भावार्थ गीत रामायण '

महाराष्ट्राचे राज्यपाला माननीय भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दि २५ डिसेंबर २०२१ रोजी पुणे येथे प्रकाशित होत आहे .

हा पत्ररुप संवाद ग्रंथ 'आनंद संवाद' , आपण आज आपल्या कुटुंबीय तसेच स्नेही युवक युवतींसाठी खरेदी करा .

हा ग्रंथ अमृतसंचय प्रतिष्ठान व शिक्षण प्रसारक मंडळी , पुणे
संयुक्तपणे प्रकाशित करत आहेत .

ग्रंथ पृष्ठ संख्या ४७६ , मूळ किंमत ७०० रुपये , सवलत मुल्य ६०० रुपये अधिक टपाल शुल्क ८० रुपये , आपल्या संग्रही असावा ग्रंथ आजच नोंदवा .

आॕन लाईन नोंदणीसाठी
बँक - स़ंपदा सहकारी बँक
खाते क्रमांक - अमृतसंचय प्रतिष्ठान - 001002300039500
IFSC - IBKL0459SBS
ग्रंथ नोंदणी करणाऱ्याचे नाव , पत्ता

हे आवाहन नरेंद्र उंब्रजकर ,सचिव , अमृतसंचय प्रतिष्ठान ,पुणे द्वारा करण्यात येतआहे .

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Pune